Tuesday, July 21, 2009

कोई तो है वो...

कोई तो है वो...

कोई तो है वो...
मेरे लिये बहोत ख़ास है वो...

जिंदगी से ना कोई गिला
ना कोई था शिकवा..
तेरे साथ जीने के लिये
लहराती थी मुझे ये हवा...

पागल बन बैठा था तेरे लिये
और थोडा आवारा..
भूल के भी भूलना तुझे
ना था मुझे गवारा...

एक आदत सी हो गयी थी
तुम्हारा रोज सपनों मे आना..
सारे दर्द भुलाकर
मुस्कुराकर चले जाना...

काश कोई करिश्मा
फिर एक बार हो जाये..
सपनों से निकल के
कभी सामने तू आ जाये...

दिल की तमन्ना है
के तुम मेरे साथ रहो..
दिन मे हो या रात मे
देखा ये सपना काश कभी सच हो...

---------------मनोज
१८ जुलै २००९

या पावसाला काय वेड लागलंय का...?

या पावसाला काय वेड लागलंय का...?

वेळ ना काळ
केव्हाही येतो..
सकाळ ना संध्याकाळ
उगाच आपला बरसतो...

अरे,
याला कळत कसं नाही...!
ती मला भेटायला येणार होती..
वेळात वेळ काढून
निवांतपणे थांबणार होती...

ती येणार म्हंटलं की,
त्याचा कसा होतो बघा जळफळाट
त्याच्यामुळे येता आले नाही की,
तिचा घेतो मग तो तळतळाट

चिडुन नंतर ती बोलते,
याची तक्रार देवाकडे करायला हवी..
तो म्हणतो, देव तसा बाका आहे
त्याने ती ऐकायला तर हवी...

राग येतो तिला, म्हणते
हा तर खुपच निर्लज्ज आहे,
जायचे काहि नाव नाही..
फक्त इथेच बरसेल
इतरत्र याची कुठे धाव नाही...

कंटाळलेली ती,
आता मात्र जायला निघते..
म्हणते, आता बरी माझ्यापाठी
यालाही जायची लहर येते...

त्यालाही थोडी लाज वाटते..
थांबतो, बरसत रहातो निरंतर तिथेच...
सकाळ, दुपार, संध्याकाळ अन रात्रभर.....

------------------मनोज
१९ जुलै २००९

Monday, July 13, 2009

असल्या या मुंबईत...

असल्या या मुंबईत...


इकडे तिकडे न पहाता

आम्ही रस्ता ओलांडणार,

बेदरकार गाडी चालक

कुणी आम्हाला येवून धडकवणार,,

चार-आठ दिवस पलंगावर पडून

दवाखान्याचे बिल वाढवणार,,,

वाहतुकीचे नियम माहिती आहेत

तरी आम्ही सिग्नल तोडणार,

घरदार नाही म्हणुन

आम्ही फुटपाथवरच झोपणार,,

नशेबाज श्रीमंताचं पोरं एखादं

गाडीने आम्हाला चिरडत जाणार,,,

असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार

रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार

आता उन होते म्हणत

धो-धो पाउस कोसळणार,

थोडया-थोडक्या पावसानेही

गटारी, नाले तुडुम्ब भरणार,,

रस्ते, गल्लीबोळातुन

घराघरातून पाणी शिरणार,,,

मुलभूत सुविधांअभावी

अनेक जीव पाण्यात जाणार,

जीव तोडून कशीबशी

मदतीसाठी हाक मारणार,,

प्रशासनाला शिव्या देत

दोन दिवसांनी घरी पोहचणार,,,

असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार

रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार

प्रांतिक अन भाषिक वाद

इथे रोजच चालणार,

हाणामा-या, बंद

जाळपोळ अन दगडफेक,,

मराठी- अमराठींना

अमराठी- मराठींना मारणार,,,

गर्दीतून येणारा एक दगड

कुणाचंही डोकं फोडणार,

कुणी एक नेता

जमावाला आपल्या जाळ्यात ओढणार,,

त्यातच कुणी एक आपलं

धार्मिकतेचं पिल्लू हळूच सोडणार,,,

असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार

रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार

सारे देशच जणू

मुंबईचे शत्रु,

अमेरिकन नागरिकही

इथे घरात बसून कट करणार,,

हा इथे आला कसा॥?

पोलीस शोधात वेळ घालवणार,,,

रस्ते बंद करूनही

अतिरेकी समुद्रीमार्गे येणार,

लोकल, हॉटेल, दवाखाने

यांना बॉम्बचे लक्ष्य बनवणार,,

आमचा आपला एकच प्रश्न,

आम्ही अजुन किती सहन करणार॥?

असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार

रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार

----------------------------------------मनोज

१ डिसेंबर २००८

दिसं गेले, रात्र गेली...

दिसं गेले, रात्र गेली

काळ सरला सरसर,

यादरम्यान ठावुक नाही तुला

माझ्या मनाची झाली किती मरमर...

मी तुला विसरलो

असं साहजिकपणे तुला वाटलं असावं,

म्हणुन काय तू आपलं

इतके दिवस रुसावं...?

घाईगर्दीचं जीवन असतं हे

अनाहुतपणे काही गोष्टी घडतात,

चार क्षण सुखासाठी

सारेच इथे धडपडतात...

वेडाबाई कुठली,

आताशा तू खुप त्रास देतेस,

थोडा-थोड़का उरलेला

माझा जीव सुद्धा घेतेस...

पुरे झाले आता

कधी येणार आहेस ते सांग,

येतांना मात्र आपल्यासाठी

देवाकडे खुप सारं सुख माग...

--------------------मनोज

२० डिसेंबर २००८

प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं...

संतोष- संतोषी च्या जुन्या कवितेच्या संदर्भात...

प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं

बायको झाल्यापासून

भांडणे खुप वाढली आहेत,

संसाराच्या वृक्षावरील

हिरवी पाने पार झाडली आहेत,,

उरला आहे तो फ़क्त पालापाचोळा...

प्रेयसी असतांना,

"तू म्हणशील तसंच होणार"

असं सारं नेहमी म्हणायची,

आता मात्र माझ्यावरंच

वेळ आली आहे रडायची,,

उरलं आहे ते फ़क्त अश्रुत बुडायचं...

प्रेयसी असतांना,

वेळ देत नाही म्हणायची

बायको म्हणुन सोबत असतांना

काय दिवे लावतेय,

"आमचं किती प्रेम आहे"

असं सा-या जगाला उगीचं दाखवतेय,,

उरला आहे तो फ़क्त बिनपैश्याचा तमाशा...

प्रेयसी असतांना,

माझ्याकरीता तुला

खुप गोष्टी कराव्याश्या वाटायच्या,

बायको झाल्यानंतर मात्र

कणिक तू मळायचीस

अन पोळ्या मी लाटायाच्या...?

उरलं आहे ते फ़क्त पूर्ण वेळ स्वयंपाकी व्हायचं...

प्रेयसी असतांना,

तुला सोडुच नये असं वाटायचं

बायको झाल्यानंतर

कधी एकदाचं सोडतो असं झालंय,

कामे दोघांनी करायची असतात

पण तू माझं ओझ्याचं गाढव केलंय,,

उरलं आहे ते फ़क्त ओझं वाहता-वाहता जीव सोडायचं...

--------------------------------------मनोज

२२ डिसेंबर २००८